Wednesday, May 23, 2018

बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण



आजचा युवक , आजचा तरुण हा उद्याचा सुजाण नागरिक असतो . म्हणूनच आजच्या युवा पिढीला सुशिक्षित असणे सर्वच क्षेत्राची योग्य ती माहिती असणे गरजेचे असते , कारण या युवा पिढीच्या हातातच पुढे जाऊन देशाची आर्थिक सामाजिक प्रगती अवलंबून असते . म्हणूनच युवा पिढीला सक्षम करण्यासाठी अनेकदा सरकार प्रयत्नशील असते . आजची युवा पिढी सक्षम असणे अतिशय आवशक्य आहे . परंतु गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता हल्ली अल्पवयीन मुले तरुण होण्याच्या आधीच बालपणातच गुन्हेगारी कडे वळतात , त्याची अनेक कारणे आहेत , परंतु बालगुन्हेगारी चा चढता आलेख पाहता ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्र असो वा संपूर्ण भारतात एकूणच गुन्हेगारीत प्रचंड अशी वाढ होत आहे. छो्यामोठ्या चोऱ्या, घरफोड्या, खून, दरोडे तसेच प्राणघातक हल्ले अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक अशी वाढ दिसून येते.
विशेषतः अल्पवयीन मुलांकडून बलात्कार सारख्या गुन्हामध्ये वाढ झालेली आहे. बाल गुन्हेगारीचा चढता आलेख बगता ही एक खूप मोठी सामाजिक समस्या बनत चालली आहे.
नेमकी काय कारणे असतील याची?. गरिबीमुळे बाल गुन्हेगारी वाढते ही समजण्या सारखी गोष्ट आहे पण अलीकडे श्रीमंत घरातील मुलेही अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकत चालली आहे.
गरीबी, पैशाची चणचण, व्यसन पूर्ती साठी पैशाची गरज, आजूबाजूच्या लोकांचे श्रीमंती राहणीमान, मोबाईल, टॅब या सारख्या वस्तूंचे आकर्षण इत्यादी कारणां मुळे ही मुले गुन्हेगारी कडे आकर्षित होतात.अत्यंत हलाखीची गरिबीची परिस्थिती असणारी मुले ही  रस्त्यावर  ,रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, फ्लटफॉर्म वर राहत असतात.अश्या ठिकाणी गुन्हे मोठ्या प्रमाणावर होतात. अनेकदा ही मुले मोठ्या मुलांचे बघूनही गुन्हेगारी कडे वळतात. मुंबई व दिल्ली तील बलात्काराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले सुध्दा पकडली गेली आहे.
केवळ गरीब घरातील मुलेच गुन्हे करतात असे नाही, अनेकदा उच्च मध्मवर्गीय तसेच धनाढ्य घरातील मुलेही गुन्हेगार म्हणून पकडली जातात. वाईट संगत, पालकांचे मुलांवर लक्ष नसणे, एक व दोन मुले असल्याने त्यांचे प्रमाणाबाहेर लाड होणे, त्यांनी मागितलेली कोणतीही वस्तू त्यांना लगेच आणून देणे, त्यामुळे मुले लाडवतात व त्यांना नकार ऐकण्याची सवय राहत नाही. अशा मुलांचे जरा बिनसले की किंवा त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्यांचा मानसिक तोल जातो. चित्रपट, टीव्ही वरील हिंसक दृश्ये व कामुक दृश्ये वा अश्लिल चित्रपट पाहण्याची सवय, इंटरनेट चा गैरवापर, पॉर्न पाहण्याची सवय यामुळे उच्चभ्रु कुटुंबातील मुले गुन्हे करण्यासाठी प्रवुत्त होतात. अल्पवयीन मुलांनी लैंगिक गुन्ह्यकांडे वळण्याची इथूनच खरी सुरवात  होते.
पालक वर्ग बड्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतो व उरलेला वेळ हा मॉल मध्ये मजा करण्यात जातो. त्यामुळे त्यांचे मुलांकडे लक्ष नसते. मुलगा वा मुलगी काय करतात, त्यांचे मित्र कोणते, ते कुणाबरोबर वेळ घालवत आहेत, कुणाशी चॅट करत आहेत, त्यांचे छंद कोणते, त्यांना कोणता नाद लागला आहे का हे बघण्यासाठी त्यांना आजिबात वेळ नाही.असे लक्ष न दिल्याने पुढे वेळ निघून गेलेली असते.
बाल गुन्हेगार  यांच्या कडून घडणाऱ्या प्रत्येक गुन्हा ची नोंद असते असे नाही त्यामुळे अश्या प्रकाराच्या गुन्ह्यांची संख्या मोठी असण्याची शकयता जास्तच आहे .
दिल्ली घटनेनंतर बलात्कार सारख्या घटनेमध्ये जर अल्पवयीन मुले सहभागी असतील आणि त्यांना कठोर शिक्षा व्हायची असेल तर अल्पवयीन मुलाचे वय १८ वरून १६ वर आणयात आले आहे.
भावी युवा पिढी देशाचा समाजाचा विकास चागल्या प्रकारे करू शकते हे विसरुन चालणार नाही म्हणूनच
 बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालक, सरकार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. आणि योग्य तो तोडगा काढून ही समस्या मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे . अन्यथा देश समाज याची प्रगती  अधोगतीला लागून समाज रसातळाला जायला वेळ लागणार नाही . moregauri

3 comments:

  1. हा लेख बाल गुन्हेगारी वर चांगले भाष्य करतो.बाल गुन्हेगारी पुढे किती मोठी सामाजिक समस्या होऊ शकते हे पण सांगतो.बाल गुन्हेगारी वरील उत्कृष्ट लेख.

    ReplyDelete
  2. गुन्हेगारी विश्वात आगामी समस्या काय असतील हे योग्य परीक्षण ह्या ब्लॉग मध्ये केले आहे गुन्हे वाढल्याने बालगुन्हेगारीचा प्रश्नांची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही पण आज हा ब्लॉग वाचल्यावर बालगुन्हगरीची गंभीरता व आगामी परिणाम लक्षात येतात सुंदर व परिपूर्ण ब्लॉग.

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती आहे मांडणी पण !

    ReplyDelete