स्त्री ही खूप कणखर असते ,21 व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत व आपली प्रगती करत आहेत , असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलाच सहभाग नाही , तरीही समाजात घडणाऱ्या काही घटना , म्हणजेच स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार समोर आले की मन सुन्न होते आणि अनेक प्रश्न पडतात की खरच महिला सुरक्षित आहेत ? स्त्री सबलीकरण होत आहे असे बऱ्याच ठिकाणी अनेक वेळा ऐकायला येते पण खरंच आहेत का महिला सबल? परंपरागत चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृती मधे आता बदल झालाय , आता स्त्री पुरुष समानता आहे असे फक्त म्हटले जाते "महिलांवरील वाढते अन्याय आत्याचार पाहता स्त्री पुरुष समानता फक्त बोलण्यापूरती मर्यादीत असून आजही महिलेला समाजात दुय्यमच वागणूक मिळतेय अशी खंत वाटते ,
एकविसाव्या शतकात प्रवेश करतांना भारत जगातील एक महासत्ता म्हणून उदय पावत आहे. सगळया बाबतीत आपण प्रगती करीत आहोत. असे कुठलेही क्षेत्र नाही ज्या मध्ये भारत प्रगती करीत नाही.सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरिने स्त्रिया सुद्धा प्रगती करीत आहेत. नुकतेच आवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ हे लढाऊ विमान उडवून नवा इतिहास रचला. एवढे असुनही काही घटना घडल्या की भारताची मान शरमेनं खाली जाते.
कथूवा, उनाव, सुरत अशा अनेक ठिकाणी जेव्हा बलात्काराच्या घटना समोर येतात त्यातही १६ वर्षा खालील मुलींवर अमानुष असे बलात्कार होतात तसेच काहींची तर हत्या सुध्दा केली जाते. अशा वेळेस एक संवेदनशील मनाला खुप यातना होतात.असे वाटते की आपण फक्त भौतिक प्रगती साध्य केली आहे. मात्र आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.
दिल्ली मधील २०१२ सालि झालेले निर्भया प्रकरण तर अंगावर काटे आणणारे होते. त्यानंतर सर्व देश खडबडून जागा झाला आणि कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ यांनी एकत्र येत काही कठोर कायदे आणले जसे की पोस्को अॅक्ट.ज्या अंतर्गत १६ वर्षा खालील मुलांचा जर समावेश बलात्कार मध्ये असेल तर अशा मुलांना पण प्रौढ म्हणूनच त्यांचावर कार्यवाही होयील.तसेच अशा प्रकारच्या केसेस लगेच ऑनलाइन रजिस्टर होतील.
आपल्या देशात प्रत्येक २ मिनिटात एक बलात्कार होतोय. ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे. त्यातही अल्पवयीन मुली वरील अत्याचार खूपच जास्त प्रमाणात वाढत आहेत.याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कडून न होणारा प्रतिकार. अर्थात बालके लहान असल्यामुळे ते बिचारे प्रतीकराही करू शकत नाहीत.एवढे करूनही या वर्षी जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेला कथुवा बलात्काराने देश पुन्हा हादरला. एका ८ वर्षाच्या निष्पाप मुलीला ३-४ जणांच्या टोळक्याने एका मंदिरात ५-६ दिवस तिला बेशुद्ध करून बलात्कार केले. ही बातमी वाचून मन अगदी सुन्न झाले.असे वाटले की खरंच हा आपला भारत आहे ज्याच्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे, जिथे स्त्रिला मातेचा दर्जा आहे, जसे सरस्वती माता, दुर्गा माता, लक्ष्मी माता इत्यादी इत्यादी.जिथे आपण स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना शिक्षण देत आहोत.तरीही असे घृणास्पद प्रकार आपल्या देशात होतात.
यावर उपाय म्हणजे कायदे कठोर तर केलेच पाहिजे पण त्यातही अश्या केसेस चे निकाल हे जलद न्यायालयाने चालवले गेले पाहिजेत. म्हणजे पीडितांना लवकर न्याय मिळेल. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे.म्हणजे इतरांना चांगला वचक बसेल.
तसेच महिला वरील अत्याचार च्या घटना विरोधात जर समाज ऐकवटला आणि न्यासाठी लढू लागला तर कोणत्याच नराधमाचे हात सरसावणार नाहीत अशा प्रकारची कृत्य करण्या साठी ,कोणाचीच हिंम्मत होणार नाही महिलांकडे वाकड्या नजरेने बगण्याची .
एकविसाव्या शतकात प्रवेश करतांना भारत जगातील एक महासत्ता म्हणून उदय पावत आहे. सगळया बाबतीत आपण प्रगती करीत आहोत. असे कुठलेही क्षेत्र नाही ज्या मध्ये भारत प्रगती करीत नाही.सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरिने स्त्रिया सुद्धा प्रगती करीत आहेत. नुकतेच आवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ हे लढाऊ विमान उडवून नवा इतिहास रचला. एवढे असुनही काही घटना घडल्या की भारताची मान शरमेनं खाली जाते.
कथूवा, उनाव, सुरत अशा अनेक ठिकाणी जेव्हा बलात्काराच्या घटना समोर येतात त्यातही १६ वर्षा खालील मुलींवर अमानुष असे बलात्कार होतात तसेच काहींची तर हत्या सुध्दा केली जाते. अशा वेळेस एक संवेदनशील मनाला खुप यातना होतात.असे वाटते की आपण फक्त भौतिक प्रगती साध्य केली आहे. मात्र आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.
दिल्ली मधील २०१२ सालि झालेले निर्भया प्रकरण तर अंगावर काटे आणणारे होते. त्यानंतर सर्व देश खडबडून जागा झाला आणि कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ यांनी एकत्र येत काही कठोर कायदे आणले जसे की पोस्को अॅक्ट.ज्या अंतर्गत १६ वर्षा खालील मुलांचा जर समावेश बलात्कार मध्ये असेल तर अशा मुलांना पण प्रौढ म्हणूनच त्यांचावर कार्यवाही होयील.तसेच अशा प्रकारच्या केसेस लगेच ऑनलाइन रजिस्टर होतील.
आपल्या देशात प्रत्येक २ मिनिटात एक बलात्कार होतोय. ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे. त्यातही अल्पवयीन मुली वरील अत्याचार खूपच जास्त प्रमाणात वाढत आहेत.याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कडून न होणारा प्रतिकार. अर्थात बालके लहान असल्यामुळे ते बिचारे प्रतीकराही करू शकत नाहीत.एवढे करूनही या वर्षी जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेला कथुवा बलात्काराने देश पुन्हा हादरला. एका ८ वर्षाच्या निष्पाप मुलीला ३-४ जणांच्या टोळक्याने एका मंदिरात ५-६ दिवस तिला बेशुद्ध करून बलात्कार केले. ही बातमी वाचून मन अगदी सुन्न झाले.असे वाटले की खरंच हा आपला भारत आहे ज्याच्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे, जिथे स्त्रिला मातेचा दर्जा आहे, जसे सरस्वती माता, दुर्गा माता, लक्ष्मी माता इत्यादी इत्यादी.जिथे आपण स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना शिक्षण देत आहोत.तरीही असे घृणास्पद प्रकार आपल्या देशात होतात.
यावर उपाय म्हणजे कायदे कठोर तर केलेच पाहिजे पण त्यातही अश्या केसेस चे निकाल हे जलद न्यायालयाने चालवले गेले पाहिजेत. म्हणजे पीडितांना लवकर न्याय मिळेल. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे.म्हणजे इतरांना चांगला वचक बसेल.
तसेच महिला वरील अत्याचार च्या घटना विरोधात जर समाज ऐकवटला आणि न्यासाठी लढू लागला तर कोणत्याच नराधमाचे हात सरसावणार नाहीत अशा प्रकारची कृत्य करण्या साठी ,कोणाचीच हिंम्मत होणार नाही महिलांकडे वाकड्या नजरेने बगण्याची .
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण , ज्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता , त्या गुन्हे तील आरोपी ना
ReplyDeleteलवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी मराठा समाज ऐकवटला रस्त्यावर उतरला , मुकमोर्चे काढून पीडिते ला न्याय मिळवून देण्या साठी लढू लागला , असे झाले तर अशा स्वरूपाच्या वाईट कृत्य करणाऱ्या वर नक्कीच समाज आणि कायदा दोघाच्या माध्यमातून वचक नक्कीच बसेल,
खरंच स्त्रिया विशेषत लहान मुलीवरील अत्याचार खूपच वाढ होत आहे. हा लेख आपल्याला वस्तुस्थतीकडे घेऊन जातो.खूपच माहितीपुर्ण लेख.
ReplyDeleteस्त्रियांच्या निंदनीय उपेक्षेचे वास्तव दाखविणारा व निद्रिस्त समाजाचे डोळे उघडणारा लक्षवेधी ब्लॉग.
ReplyDeleteGood
ReplyDeleteखूप छान लेख आहे सध्या जे महिला सबलीकरण चे झेंडे मिरवले जातात ते तर महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या वरून तर कुठेच दिसत नाही कायदे कडक करायला पाहिजेत
ReplyDeleteमहिला आणि अल्पवयीन मुलींवर वारंवार होणारे अत्याचार ही आजच्या काळातील खरंच चिंतेची बाब आहे. यावर लेखिकेने पोटतिडिकेने आपले मत मांडले आहे. विचार करायला लावणारा ब्लॉग
ReplyDeleteस्त्री ला स्वातंत्र्य आणि सुरक्षा हवी आहे छानच गौरीजी
ReplyDeleteKhar aahe. 21 shatakatahi mahila surakshit nhi aani hi lajirvani goshta aahe.
ReplyDeleteनक्कीच
ReplyDelete