अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे , कारण आज देश ईतका प्रगत झालाय आधुनिक तंत्रज्ञान च्या युगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतोय , समाज सुशिक्षित आहे , तरीही पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेल्या काही अनिष्ट रुढी , चालीरीती , परंपराचा आजही समाजावर जबरदस्त पगडा आहे , या पगड्या मुळे काही वर्षा पृवी समाज हा या अंधश्रद्धा वर विश्वास ठेवून स्वतःची प्रगती खुंटवत होता आणि रसातळाला जात होता , कालांतराने शिक्षणच्या प्रसाराने समाजातील लोक शिक्षण घेऊ लागले परिणामी अंधश्रद्धा चे प्रमाण कमी होऊ लागले परंतु हा पगडा पूर्णपणे कमी झाला होता असे नाही , अंधश्रध्दा च्या विळख्यात अडकलेला समाज हा स्वतःची प्रगती खुंटवत होता हीत पर्यंत ठीक होते , परंतु आता या अंधश्रध्दा मुळे घडणाऱ्या गुन्ह्या मध्ये कमालीची वाढ झाल्याचे हल्ली प्रसारमाध्यमा मधुन प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर प्रकर्षाने लक्षात येते, रोज कुठे ना कुठे अंधश्रध्दा मुळे घडलेला विकृत प्रकार समोर येतो आणि मन अस्वस्थ ,सुन्न होते.
या अंधश्रध्ये मध्ये ठराविक जातिचे लोक भरडले जातात असे नाही तर सर्वच जाती धर्माचा या विळख्यात अडकणाऱ्या मधे समावेश आहे , गेल्या सहा महिन्यात तर या स्वरूपाचे अनेक गुन्हे समोर आले आहेत .
काही दिवसांपूर्वी मुंबईत भायखळा येथे ऐका अठरा वर्षीय तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाला त्याचे वडील हे चर्च मधे फादर होते त्यांनी आपल्या मृत मुलाच्या देहावर अंत्यसंस्कार करायचे सोडून"" येशु एसमे फिर से जाण डालेगा "" अंधश्रद्धा पोटी त्या मुलाचा मृतदेह पेटीत ठेऊन चर्च मधे प्रार्थना करण्यास सुरुवात केली यात त्याचे नातेवाईक ही सामील होते ही बाब नजीकच्या पोलिसांना कळताच त्यांनी मृतदेहावर ताबडतोब विधी करन्याच्या सूचना संबधीत नातेवाईक व मुलाचे वडील याना दिल्या तर त्या नंतर मुलाच्या वडिलांनी तो देह भायखळा च्या चर्च मधून कडून अंबरनाथ येथील चर्च माधे आणला आणि पुन्हा प्रार्थना करण्यास सुरुवात केली याची खबर स्थानिक पत्रकार कडून अंबरनाथ पोलिसाना
समजली व त्यांनी चर्च मधे जाऊन तपास केला व वडील व नातेवाईक याच्या वर अंधश्रद्धा कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु या अंधश्रध्दा मूळे त्या मुलाच्य मृतदेहावर 22 दिवस अंत्यविधी झाला नाही . या घटनेने परिसरात खळबळ माजली होती .
नालासोपारा मधे ऐका 5 वर्षाच्या मुलीला शोचालयाला नियमित होत नव्हते त्यामुळे तिच्या पोटात दुखत होते त्या मुलीला डॉक्टर कडे न नेता तिच्या आई ने तिला ऐका भक्तीन कडे नेले अंगात आलेल्या देवाने ती बरी होईल असे त्या मुलीच्या आई , ला वाटले ती भक्तीन त्या 5 वर्ष्याच्या चिमुकली च्या पोटात भूत आहे असे सांगू लागली आणि त्या मुलीच्या पोटावर नाचली त्यात या चिमुकलीचा मृत्यू झाला , आई वडील व ती अघोरी कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली पण यात त्या निरागस व निर्दोष मुलीचा मात्र नाहक बळी गेला .
लोणावळा मधील ऐका नगररसेविकेच्या घराच्या दारा बाहेर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जादू टोना करून ऐक उतारा ठेवण्यात आला होता त्या सोबत चिट्टी सापडली त्यात मी तुझ्यावर काळी जादू केली आहे तू निवडून नाही येणार अशा स्वरूपाचा मजकूर लिहिला होता याचाही सी सी टी वि च्या मद्यमातून पोलिस तपास सुरू आहे .
बदलापूर मधे एका महिलेने गुप्तधन मिळवण्या साठी स्वतःच्या राहत्या घरात मोठा खड्डा करून त्यात तब्बल 12 लहान मुला मुलींना अपहरन करून कोंडुन ठेवले त्या मुलांचा ती आमावस्या च्या रात्री बळी देणार होती त्याने तिला गुप्तधन
मिळणार होते या प्रकाराची माहिती पोलीस ना मिळाली व त्या मुलाचे प्राण वाचले त्या महिलेला अटक झाली .
आशा स्वरूपाच्या घटना रोज कुटे ना कुटे समोर येतच असतात . नरबळी साठी अपहरण करून करण्यात येणाऱ्या हत्या दीवसेनदीवस वाढतच आहेत नरबळी साठी अनेक लहान मुलाच्या हत्या करण्यात आल्या आहेत . पूर्वी विधवा केशवपन , बाल विवाह, देवदासी , अशा स्वरूपाच्या चालीरीती मुळे समाज अंधश्रद्धा च्या विळख्यात अडकला होता , आता मात्र यांचे प्रणाम कमी झाले असले तरी काळी जादू , मोहिनी विद्या , संमोहन विद्या , भानामती , चेटूक नाटूक. या भयानक प्रकारच्या गोष्टी मध्ये समाज अडकला आहे . ज्यामुळे अनेक गंभिर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत .
आशा स्वरूपाचे गुन्हे थांबविण्यासाठी तसेच समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्या साठी काही संस्था कार्यरत आहेत , 2013 साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील करण्यात आला , या कायद्याला पाच वर्ष होऊन गेली तरी समाजा वरील हा अंधश्रद्धा चा पगडा कायम तसाच आहे . अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा खूप उपयोग होऊ शकेल,अंधश्रद्धेचा लाभ घेणाऱ्या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी काही विद्यमान कायद्याचा उपयोग होतो, पण एकतर या कायद्याचा मूळ हेतू हा या प्रकारच्या गुन्हेगारांना प्रत्यवाय करण्याचा नसल्यामुळे या कायद्याच्या आशयाची बरीच ओढाताण करून गुन्हेगारांना शिक्षा करावी लागते. प्रत्येक वेळी हा प्रयत्न यशस्वी होतोच असे नाही. दुप्पट पैसे करून देणे, पुत्रप्राप्तीची हमी देणे,बोलका पत्थर विकत घेणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व सर्व व्याधी दुरुस्त होतील, असे आश्वासन देणे आणि भाबड्या लोकांची नागवणूक करणे, हे सरळसरळ गुन्हे आहेत. पण अनेकदा हे गुन्हेगार कायद्याच्या मौनाचा वा अभावाचा गैरफायदा घेतात आणि मोकाट सुटतात. त्यांना धडा शिकविण्याची प्रामाणिक इच्छा असलेली सरकारी यंत्रणाही कायदेशीर आधाराच्या अभावी हतबल ठरते . व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्याच्या राजरोसपणे हत्या केल्या जातात . कायदा असूनही या विळख्यातून समाजाला पुर्णपणे काढणे सहज शक्य नाही . परंतु समाजातील प्रत्येकाने जर स्वतः जबाबदार नागरिक बनून आप आपल्या मनाशी ठरवले की अंधश्रद्धा वर विश्वास ठेवायचा नाही . त्यांना खतपाणी न घालता त्याचा विरोध करायचा तरच समाज या जाळ्यातून मुक्त होण्यास मदत होईल . तरच समाजाला लागलेली ही कीड नाहीशी होऊन समाजाची प्रगती होईल व देश विकसनशील नवे तर विकसित देश म्हणून उदयास येईल .
खूप छान लिहिलंय खरच आजही समाज कितीही सुशिक्षित झाला तरी अंधश्रद्धे मध्ये गुरफटलेला आहे सुरवात ही दुसर्याने करावी अशी अपेक्षा करण्यापेक्षा जर प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली तर लवकरच समाज अंधश्रद्धा मुक्त होईल आणि जे कायदे केले आहेत तेही अजून कठोर केले पाहिजेत
ReplyDeleteदेशातील अंधश्रध्दा ने किती भयंकर रूप धारण केले हे वरील ब्लॉग मधून स्पष्ट होते.त्यामुळेच त्या विरूद्ध अधिक कठोर कायदे केले पाहिजे.
ReplyDeleteलेख त्यावर चांगले भाष्य करतो.
अजून आमची मानसिकता बदलत नाही अवघड आहे
ReplyDeleteमस्त गौरी जी सविस्तर लिहिलेय
लोकशिक्षण लोकजागृती चे महत्व अधोरेखित करणारा उत्स्फूर्त ब्लॉग समाजाला वैज्ञानिक दृष्टिव्ही गरज आहे हे हा बलॉग वाचून पटते.
ReplyDeleteअजूनही आपल्या समाजाची मानसिकता बदलत नाहीये याचीच खंत वाटते. या संदर्भात जनजाग्रुती ही काळाची गरज आहे हेच या लेखात अधोरेखित केले आहे.खूप छान ....
ReplyDeleteVery nice article
ReplyDeleteKhup chhan
DeleteTe mmhantat na kutrya ch sheput nalit takl tri vadk te te vadk ch
Ashi paristhiti ahe aj chya lokanchi