माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजात राहून तो स्वतःची प्रगती स्वताचा विकास साधत असतो आणि म्हणूनच समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा त्याच्या वर परिणाम होत असतो . असाच मानव जीवनावर परिणाम करणारे विविध गुन्हे तसेच गुन्हेगारी चे बदलते स्वरूप या विषयावर आजच्या माझ्या ब्लॉग लेखनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करतेय.
१९८०-९० च्या दशकात भारतात विशेषतः महाराष्ट्रात गॅंग वॉर खूप प्रचंड प्रमाणात होते. अशा प्रकारच्या गुन्हेगारीची सुरुवात कापड गिरण्या बंद झा्यानंतर प्रामुख्याने झाली. हातांना काम नसल्यामळे तसेच झटपट पैसा कमवायचा असल्यामुळे तेव्हाचा तरुण वर्ग अश्या प्रकारच्या गुन्हेगारी कडे वळला. त्यातूनच पुढे या गुन्हेगारांच्या टोळ्या पडला. यातूनच एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. याचाच परिणाम म्हणजे एकमेकांची गळेकापू स्पर्धाच लागली या टोळ्यांमध्ये. विशेषतः मुंबई मध्ये याचे प्रमाण खूपच जास्त होते यातूनच पुढे दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन असे अट्टल गुन्हेगार निर्माण झाले.मुंबई पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या म्हणून आज मुंबई शांत व सुरक्षित आहे
टोळी टोळी च्या मधील भांडण आणि त्यातुन होणारे गुन्हे यातुन समाज सुटतो न सुटतो तोच सायबर crime अंतर्गत घडणारे गुन्हे आशा नव्या संकटाने पुन्हा समाजाला घेरले ,
: हल्ली आपण सायबर क्राईम, कॉम्प्युटर हॅकिंग असे अनेक नवीन शब्द ऐकत असतो. काय आहे नक्की हा प्रकार, काय आहे गुन्हेगारीचे बदलेले स्वरूप हे आपण जाणून घेऊया ,
गुन्हेगारी म्हणजे फक्त खून, दरोडा, चोरी या पुरताच मर्यादित रहालेली नाही, हीचे स्वरूप आता बऱ्यापैकी बदलेले आहे.
पूर्वी आपण वर्तमानपत्रात वाचायचो की आज आमुक या ठिकाणी दरोडा पडला, आज आमुक् ही बँक लुटली गेली, किंवा आज अामुक या ठिकाणी दरोडेखराकडून इतके लोकांचा खून झाला इत्यादी इत्यादी.
जरी अशी प्रकारची गुन्हेगारी थांबली नसली तरी त्यात आता सायबर क्राईम चा गुन्हांची भर पडली आहे.
मागील काही महिन्यांपासून आपण काही नवीन शब्द ऐकत आलोय जसे की "जगातील अनेक राष्ट्रामध्ये wannacry नामक कॉम्प्युटर व्हायरस ने धुमाकूळ घातला होता. अनेक राष्ट्रामध्ये hospital, education institutes, companies यांच्या कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्यात आल्या होत्या. कॉम्प्युटर हॅक करणाऱ्यांनी आपल्या माहितीच्या बदल्यात एका कॉम्प्युटर मागे ३०० डॉलर एवढी प्रचंड रक्कम मागितली होती.
असे अनेक प्रकारचे सायबर क्राईम जगाच्या कुठल्या न कुठल्या तरी कोपऱ्यात होतच असतात. अशा प्रकारचे सायबर क्राईम करणारे गुन्हेगार हे जगात कुठल्याही देशात बसून जगातल्या कुठल्याही देशाचं संपूर्ण नेटवर्क सिस्टिम हॅक करू शकतात. कॉम्पुटर हॅक करणं म्हणजे आपली संपूर्ण संगणक व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेणे होय.
परंतु सायबर क्राईम वर नियंत्रण मिळवणे एवढे सोपे नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे असे प्रकारचे गुन्हेगार हे जगाच्या कुठल्याही देशात बसून हे गुन्हे करत असतात. त्यांचा नेमका ठावठिकाणा नसतो. त्यातही हे सायबर गुन्हेगार खूपच हुशार असतात. सतत आपला ठिकाणा बदलत असतात. त्यामुळे त्यांना पकडणे खूपच अवघड होऊन बसले आहे.
तरीही अश्या प्रकारच्या गुन्हेगारी साठी खास पथक नेमले जातात त्यांना एथिकल हॅकर्स असे म्हणतात.इथिकल हॅकर्स हे त्या गुन्हेगार प्रमाणेच विचार व कृती करतात. त्यामुळे असे गुन्हे रोखणे सोपे जाते.
प्रतिक्रिया कळवा
ReplyDeleteखूप माहितीपुर्ण लेख आहे.
ReplyDeleteखूप छान माहिती सायबर क्राईम बद्दल उपयुक्त माहिती
ReplyDeleteइतकी महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteChaann
ReplyDeleteगुन्हेगारीचे बदलते स्वरूप यावर छान लिखाण
ReplyDeleteखूप छान अतिशय माहितीपूर्ण लेख....
ReplyDeleteखूप छान !!
ReplyDeleteसंघटित गुन्हेगारी जगातल्या तपास यंत्रणाना आव्हान देणाऱ्या सायबर समस्याचा
ReplyDeleteव सध्याचा आर्थिक गुन्ह्यांचा आढावा आढावा घेणारा सुंदर ब्लॉग
खूप माहितीपूर्ण
ReplyDeleteसायबर क्राइमबद्दल खूप अभ्यासपूर्ण लेख ....
ReplyDeleteसायबर क्राइमबद्दल खूप अभ्यासपूर्ण लेख ....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteकायद्याचं अज्ञाय हे देखील गुन्हेगारी च एक कारण आहे
ReplyDeleteKhupach chhan.....
ReplyDeleteअभ्यासपूर्ण ब्लॉक, खूप छान माहिती.आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
ReplyDeleteNice information
ReplyDelete