Wednesday, May 23, 2018

बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण



आजचा युवक , आजचा तरुण हा उद्याचा सुजाण नागरिक असतो . म्हणूनच आजच्या युवा पिढीला सुशिक्षित असणे सर्वच क्षेत्राची योग्य ती माहिती असणे गरजेचे असते , कारण या युवा पिढीच्या हातातच पुढे जाऊन देशाची आर्थिक सामाजिक प्रगती अवलंबून असते . म्हणूनच युवा पिढीला सक्षम करण्यासाठी अनेकदा सरकार प्रयत्नशील असते . आजची युवा पिढी सक्षम असणे अतिशय आवशक्य आहे . परंतु गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता हल्ली अल्पवयीन मुले तरुण होण्याच्या आधीच बालपणातच गुन्हेगारी कडे वळतात , त्याची अनेक कारणे आहेत , परंतु बालगुन्हेगारी चा चढता आलेख पाहता ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्र असो वा संपूर्ण भारतात एकूणच गुन्हेगारीत प्रचंड अशी वाढ होत आहे. छो्यामोठ्या चोऱ्या, घरफोड्या, खून, दरोडे तसेच प्राणघातक हल्ले अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक अशी वाढ दिसून येते.
विशेषतः अल्पवयीन मुलांकडून बलात्कार सारख्या गुन्हामध्ये वाढ झालेली आहे. बाल गुन्हेगारीचा चढता आलेख बगता ही एक खूप मोठी सामाजिक समस्या बनत चालली आहे.
नेमकी काय कारणे असतील याची?. गरिबीमुळे बाल गुन्हेगारी वाढते ही समजण्या सारखी गोष्ट आहे पण अलीकडे श्रीमंत घरातील मुलेही अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकत चालली आहे.
गरीबी, पैशाची चणचण, व्यसन पूर्ती साठी पैशाची गरज, आजूबाजूच्या लोकांचे श्रीमंती राहणीमान, मोबाईल, टॅब या सारख्या वस्तूंचे आकर्षण इत्यादी कारणां मुळे ही मुले गुन्हेगारी कडे आकर्षित होतात.अत्यंत हलाखीची गरिबीची परिस्थिती असणारी मुले ही  रस्त्यावर  ,रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, फ्लटफॉर्म वर राहत असतात.अश्या ठिकाणी गुन्हे मोठ्या प्रमाणावर होतात. अनेकदा ही मुले मोठ्या मुलांचे बघूनही गुन्हेगारी कडे वळतात. मुंबई व दिल्ली तील बलात्काराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले सुध्दा पकडली गेली आहे.
केवळ गरीब घरातील मुलेच गुन्हे करतात असे नाही, अनेकदा उच्च मध्मवर्गीय तसेच धनाढ्य घरातील मुलेही गुन्हेगार म्हणून पकडली जातात. वाईट संगत, पालकांचे मुलांवर लक्ष नसणे, एक व दोन मुले असल्याने त्यांचे प्रमाणाबाहेर लाड होणे, त्यांनी मागितलेली कोणतीही वस्तू त्यांना लगेच आणून देणे, त्यामुळे मुले लाडवतात व त्यांना नकार ऐकण्याची सवय राहत नाही. अशा मुलांचे जरा बिनसले की किंवा त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्यांचा मानसिक तोल जातो. चित्रपट, टीव्ही वरील हिंसक दृश्ये व कामुक दृश्ये वा अश्लिल चित्रपट पाहण्याची सवय, इंटरनेट चा गैरवापर, पॉर्न पाहण्याची सवय यामुळे उच्चभ्रु कुटुंबातील मुले गुन्हे करण्यासाठी प्रवुत्त होतात. अल्पवयीन मुलांनी लैंगिक गुन्ह्यकांडे वळण्याची इथूनच खरी सुरवात  होते.
पालक वर्ग बड्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतो व उरलेला वेळ हा मॉल मध्ये मजा करण्यात जातो. त्यामुळे त्यांचे मुलांकडे लक्ष नसते. मुलगा वा मुलगी काय करतात, त्यांचे मित्र कोणते, ते कुणाबरोबर वेळ घालवत आहेत, कुणाशी चॅट करत आहेत, त्यांचे छंद कोणते, त्यांना कोणता नाद लागला आहे का हे बघण्यासाठी त्यांना आजिबात वेळ नाही.असे लक्ष न दिल्याने पुढे वेळ निघून गेलेली असते.
बाल गुन्हेगार  यांच्या कडून घडणाऱ्या प्रत्येक गुन्हा ची नोंद असते असे नाही त्यामुळे अश्या प्रकाराच्या गुन्ह्यांची संख्या मोठी असण्याची शकयता जास्तच आहे .
दिल्ली घटनेनंतर बलात्कार सारख्या घटनेमध्ये जर अल्पवयीन मुले सहभागी असतील आणि त्यांना कठोर शिक्षा व्हायची असेल तर अल्पवयीन मुलाचे वय १८ वरून १६ वर आणयात आले आहे.
भावी युवा पिढी देशाचा समाजाचा विकास चागल्या प्रकारे करू शकते हे विसरुन चालणार नाही म्हणूनच
 बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालक, सरकार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. आणि योग्य तो तोडगा काढून ही समस्या मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे . अन्यथा देश समाज याची प्रगती  अधोगतीला लागून समाज रसातळाला जायला वेळ लागणार नाही . moregauri

Thursday, May 17, 2018

अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी .


अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे ,  कारण आज देश ईतका प्रगत झालाय आधुनिक तंत्रज्ञान च्या युगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतोय , समाज सुशिक्षित आहे , तरीही   पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेल्या काही अनिष्ट रुढी , चालीरीती , परंपराचा आजही समाजावर जबरदस्त पगडा आहे , या पगड्या मुळे काही वर्षा पृवी समाज हा या अंधश्रद्धा वर विश्वास ठेवून स्वतःची प्रगती खुंटवत होता आणि रसातळाला जात होता , कालांतराने शिक्षणच्या प्रसाराने समाजातील लोक शिक्षण घेऊ लागले परिणामी अंधश्रद्धा चे प्रमाण कमी होऊ लागले परंतु हा पगडा पूर्णपणे कमी झाला होता असे नाही , अंधश्रध्दा च्या विळख्यात अडकलेला समाज हा स्वतःची प्रगती खुंटवत होता हीत पर्यंत ठीक होते , परंतु आता या अंधश्रध्दा मुळे घडणाऱ्या गुन्ह्या मध्ये  कमालीची वाढ झाल्याचे हल्ली प्रसारमाध्यमा मधुन प्रसारित होणाऱ्या  बातम्या पाहिल्यानंतर प्रकर्षाने लक्षात येते, रोज कुठे ना कुठे अंधश्रध्दा मुळे घडलेला विकृत प्रकार समोर येतो आणि मन अस्वस्थ ,सुन्न होते.
या अंधश्रध्ये मध्ये ठराविक जातिचे लोक भरडले जातात असे नाही तर सर्वच जाती धर्माचा या विळख्यात अडकणाऱ्या मधे समावेश आहे , गेल्या सहा महिन्यात तर या स्वरूपाचे अनेक गुन्हे समोर आले आहेत .

काही दिवसांपूर्वी मुंबईत भायखळा येथे  ऐका अठरा वर्षीय तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाला त्याचे वडील हे चर्च मधे फादर होते त्यांनी आपल्या मृत मुलाच्या देहावर अंत्यसंस्कार करायचे सोडून"" येशु एसमे फिर से जाण डालेगा "" अंधश्रद्धा पोटी त्या मुलाचा मृतदेह पेटीत ठेऊन चर्च मधे प्रार्थना करण्यास सुरुवात केली यात त्याचे नातेवाईक ही सामील होते ही बाब नजीकच्या पोलिसांना कळताच त्यांनी मृतदेहावर ताबडतोब विधी करन्याच्या सूचना संबधीत नातेवाईक व मुलाचे वडील याना दिल्या तर त्या नंतर मुलाच्या वडिलांनी तो देह भायखळा च्या चर्च मधून कडून अंबरनाथ येथील चर्च माधे आणला आणि पुन्हा प्रार्थना करण्यास सुरुवात केली याची खबर स्थानिक पत्रकार कडून अंबरनाथ पोलिसाना
समजली व त्यांनी चर्च मधे जाऊन तपास केला व  वडील व नातेवाईक याच्या वर अंधश्रद्धा कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु  या अंधश्रध्दा मूळे त्या मुलाच्य मृतदेहावर 22 दिवस अंत्यविधी झाला नाही . या घटनेने परिसरात खळबळ माजली होती .

नालासोपारा मधे ऐका 5 वर्षाच्या मुलीला शोचालयाला नियमित होत नव्हते त्यामुळे तिच्या पोटात दुखत होते त्या मुलीला डॉक्टर कडे न नेता तिच्या आई ने तिला ऐका भक्तीन कडे नेले अंगात आलेल्या देवाने ती बरी होईल असे त्या मुलीच्या आई , ला वाटले ती भक्तीन त्या 5 वर्ष्याच्या चिमुकली च्या पोटात भूत आहे असे सांगू लागली आणि त्या मुलीच्या पोटावर नाचली त्यात या चिमुकलीचा मृत्यू झाला , आई वडील व ती अघोरी कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली पण यात त्या निरागस व निर्दोष मुलीचा मात्र नाहक बळी गेला .

लोणावळा मधील  ऐका नगररसेविकेच्या  घराच्या दारा बाहेर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी  जादू टोना करून ऐक उतारा ठेवण्यात आला होता त्या सोबत चिट्टी सापडली त्यात मी तुझ्यावर काळी जादू केली आहे तू निवडून नाही येणार अशा स्वरूपाचा मजकूर लिहिला होता याचाही सी सी टी वि च्या मद्यमातून पोलिस तपास सुरू आहे .

बदलापूर मधे एका महिलेने गुप्तधन मिळवण्या साठी स्वतःच्या राहत्या घरात  मोठा खड्डा करून त्यात तब्बल 12 लहान मुला मुलींना अपहरन करून कोंडुन ठेवले त्या मुलांचा ती आमावस्या च्या रात्री बळी देणार होती त्याने तिला गुप्तधन
मिळणार होते या प्रकाराची माहिती पोलीस ना मिळाली व त्या मुलाचे प्राण वाचले त्या महिलेला अटक झाली .


 आशा स्वरूपाच्या घटना रोज कुटे ना कुटे समोर येतच असतात . नरबळी साठी अपहरण करून करण्यात येणाऱ्या हत्या दीवसेनदीवस वाढतच आहेत  नरबळी साठी अनेक लहान मुलाच्या हत्या करण्यात आल्या आहेत  . पूर्वी विधवा केशवपन , बाल विवाह,  देवदासी , अशा स्वरूपाच्या चालीरीती मुळे समाज अंधश्रद्धा च्या विळख्यात अडकला होता , आता मात्र यांचे प्रणाम कमी झाले असले तरी काळी जादू , मोहिनी विद्या , संमोहन विद्या , भानामती , चेटूक नाटूक. या भयानक प्रकारच्या गोष्टी मध्ये समाज अडकला आहे . ज्यामुळे अनेक गंभिर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत .

आशा स्वरूपाचे गुन्हे थांबविण्यासाठी तसेच समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्या साठी काही संस्था कार्यरत आहेत , 2013 साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील करण्यात आला  , या कायद्याला पाच वर्ष होऊन गेली तरी समाजा वरील हा अंधश्रद्धा चा पगडा कायम तसाच आहे . अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा खूप उपयोग होऊ शकेल,अंधश्रद्धेचा लाभ घेणाऱ्या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी काही विद्यमान कायद्याचा उपयोग होतो  पण एकतर या कायद्याचा मूळ हेतू हा या प्रकारच्या गुन्हेगारांना प्रत्यवाय करण्याचा नसल्यामुळे या कायद्याच्या आशयाची बरीच ओढाताण करून गुन्हेगारांना शिक्षा करावी लागते. प्रत्येक वेळी हा प्रयत्न यशस्वी होतोच असे नाही. दुप्पट पैसे करून देणेपुत्रप्राप्तीची हमी देणे,बोलका पत्थर विकत घेणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व सर्व व्याधी दुरुस्त होतीलअसे आश्वासन देणे आणि भाबड्या लोकांची नागवणूक करणेहे सरळसरळ गुन्हे आहेत. पण अनेकदा हे गुन्हेगार कायद्याच्या मौनाचा वा अभावाचा गैरफायदा घेतात आणि मोकाट सुटतात. त्यांना धडा शिकविण्याची प्रामाणिक इच्छा असलेली सरकारी यंत्रणाही कायदेशीर आधाराच्या अभावी हतबल ठरते . व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्याच्या राजरोसपणे हत्या केल्या जातात .  कायदा असूनही या विळख्यातून समाजाला पुर्णपणे काढणे सहज शक्य नाही . परंतु समाजातील प्रत्येकाने जर स्वतः जबाबदार नागरिक बनून आप आपल्या मनाशी ठरवले की अंधश्रद्धा वर विश्वास ठेवायचा नाही . त्यांना खतपाणी न घालता त्याचा विरोध करायचा तरच समाज या जाळ्यातून मुक्त होण्यास मदत होईल . तरच समाजाला लागलेली ही कीड नाहीशी होऊन समाजाची प्रगती होईल व देश विकसनशील नवे तर विकसित देश म्हणून उदयास येईल .

Tuesday, May 15, 2018

राजकारण आणि गुन्हेगारी .


गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेत असतानाच राजकारण आणि त्यातुन घडणारे गुन्हे याचेही पूर्वी चे स्वरूप आणि सद्याची स्थिती यात खुपच बदल झाल्याचे दिसून येते. निवडणुका च्या काळात तसेच राजकीय वैमनस्यातून होणारे गोळीबार खून हत्या आशा घटनांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे .प्रत्येक वेळी निवडणूक काळात दोन गटातील राजकीय वादातून निर्माण झालेली तेढ ही आशा प्रकारचे गुन्हे घडण्या साठी खतपाणी घालत असते, यामुळे राजकारणातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत राहते.
: भारत हा लोकशाही असलेला देश आहे. आपले  लिखित आणि विस्तृत असे सविंधान आहे. घटनेनुसार आपल्याकडे निवडणुका होतात. भारतीय राज्यघटना ही सर्व नागरिकांना समान आधिकर देते.त्यानुसार निवडणुकीत सुध्दा सर्व नागरिकांना उमेदवार म्हणून उभे राहण्याचा आधीकर आहे. हा आधिकार देण्यामागे  साविंधान कर्त्याना हेच वाटत होते की सर्व नागरिक हे समान आहेत आणि तो कुठल्याही पार्श्वभूमी चा असला तरी त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल. पण याला काही अपवाद सुध्दा आहेत.जसे की उमेदवार जर गुन्हेगार असेल, म्हणजेच त्याचा गुन्हा सिध्द झाला असेल, त्याला २ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर त्याला निवडणूक लढण्याला बंदी असेल.
पण आजची राजकारणातील परिस्थिती बागितली तर जिकडे तिकडे सगळीकडे गुन्हेगार प्रवुत्तीचे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. सगळेच राजकारणी काही गुन्हेगार नाहीत. पण १५ व्या लोकसभेचे आपण उमेदवार बगितले तर बरेच राजकारणी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले होते.

याला मोठ्या प्रमाणात असलेले कारण म्हणजे निवडणुकी मध्ये लागणारा पैसा हे आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची कितीही मर्यादा घातली तरी आजकालच्या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. आज अगदी नगरसेवकाची निवडणूक असो की पंतप्रानपदासाठी निवडणूक असो प्रचंड प्रमाणात पैसा लागतो आणि हा सगळा पैसा भ्ष्टाचारापासून तयार होतो. भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणी गुंड लोकांची साथ लागते. हेच गुंड पुढे जाऊन राजकारणात प्रवेश करतात. आणि अशा रीतीने गुंडांचा राजकारणात प्रवेश होतो

 अनेक राजकारण्यांवर तर बलात्कार, खुन, दरोडे, बँक लूट असे नाना प्रकारचे गुन्हे असतात. पण आपल्या न्यायव्यवस्थेत जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत तो निर्दोष असतो. त्यामुळे असे उमेदवार निवडणुका लढवायला मोकळे असतात. आपल्या देशात असे अनेक उदाहरणं आहेत की उमेदवार जेल मधूनही निवडणुका लढवतात आणि जिंकतात सुध्दा.
राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार होण्यासाठी संसदेने घटनादुरुस्ती करून एक चांगला पर्याय दिला त्याचे नाव म्हणजे नोटा चा अधिकार.
 नोटा चा सरळ सरळ अर्थ म्हणजे None of the above याच अर्थ वरीलपैकी कुणीही योग्य उमेदवार नाही असा होतो. म्हणजेच उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांपैकी कुणीही निवडूण यायचा योग्यतेचा नाही. ज्या मतदरसंघातील निवडणुकीत नोटा ला सर्वाधिक मते पडली तर ती निवडणूक आपोआप रद्द होते. निवडणूक आयोगाला नवीन निवडणूक घ्यावी लागते तसेच आधी दिलेले सर्व उमेदवार पक्षांकडून रद्द करून दुसरे उमेदवार द्यावे लागतात. पण नोटा बद्दल जनतेत पाहिजे तेवढी जागृती नाही. पण हळू हळू येईल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. तसेच निवडणूकीतून निवडून  येणार उमेदवार हा लोकप्रतिनिधी असतो , त्यामुळे त्याला समाजातील जनतेच्या समस्या गरज याची पूर्णपणे जाणीव असेल तर त्याच्या कडून चांगल्या पद्धतीने समाजाचे हित साधता येऊ शकेल , तसेच आपल्या कडे विविध क्षेत्रातील कामकाज नीट होण्यासाठी प्रत्येक विभागासाठी मंत्री नेमण्यात येतात यात जर त्या त्या क्षेत्रातील माहितगार व्यक्ती जर मंत्री झाले तर ते त्या क्षेत्रातिल समस्या जास्त चागल्या प्रकारे दूर करू विकास करू शकतात उदाहरण म्हणजे जर शिक्षण मंत्री शिक्षक च असतील तर त्यांना या क्षेत्रांतील गरज त्रुटी विकास होण्या साठी नेमकी काय करावे याची त्यांना पुरेपूर माहिती असेल व ते चागल्या प्रकारें त्या विभागाचा विकास करू शकतील परिणामी भ्रष्टाचार कमी होईल व आपोआपच राजकारणातील   गुन्हेगारी संपुष्टात येईल अशी अपेक्षा करूया. तसेच राजकारण म्हणजे समाजकारण असे म्हणतात तर राजकारणातील गुन्हेगारी तसेच समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कायमची नष्ट होईल अशी देखील अपेक्षा करूयात 

खरंच महिला सुरक्षित आहेत का ?

स्त्री ही खूप कणखर असते ,21 व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत व आपली प्रगती करत आहेत , असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलाच सहभाग नाही , तरीही समाजात घडणाऱ्या काही घटना , म्हणजेच स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार समोर आले की मन सुन्न होते आणि अनेक प्रश्न पडतात की खरच महिला सुरक्षित आहेत ? स्त्री सबलीकरण होत आहे असे बऱ्याच ठिकाणी अनेक वेळा ऐकायला येते पण खरंच आहेत का महिला सबल? परंपरागत चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृती मधे आता बदल झालाय , आता स्त्री पुरुष समानता आहे असे फक्त म्हटले जाते "महिलांवरील वाढते अन्याय आत्याचार पाहता स्त्री पुरुष समानता फक्त बोलण्यापूरती मर्यादीत असून आजही महिलेला समाजात दुय्यमच वागणूक मिळतेय अशी खंत वाटते ,      

एकविसाव्या शतकात प्रवेश करतांना भारत जगातील एक महासत्ता म्हणून उदय पावत आहे. सगळया बाबतीत आपण प्रगती करीत आहोत. असे कुठलेही क्षेत्र नाही ज्या मध्ये भारत प्रगती करीत नाही.सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरिने स्त्रिया सुद्धा प्रगती करीत आहेत. नुकतेच आवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ हे लढाऊ विमान उडवून नवा इतिहास रचला. एवढे असुनही काही घटना घडल्या की भारताची मान शरमेनं खाली जाते.
कथूवा, उनाव, सुरत अशा अनेक ठिकाणी जेव्हा बलात्काराच्या घटना समोर येतात त्यातही १६ वर्षा खालील मुलींवर अमानुष असे बलात्कार होतात तसेच काहींची तर हत्या सुध्दा केली जाते. अशा वेळेस एक संवेदनशील मनाला खुप यातना होतात.असे वाटते की आपण फक्त भौतिक प्रगती साध्य केली आहे. मात्र आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.
दिल्ली मधील २०१२ सालि झालेले निर्भया प्रकरण तर अंगावर काटे आणणारे होते. त्यानंतर सर्व देश खडबडून जागा झाला आणि कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ यांनी एकत्र येत काही कठोर कायदे आणले जसे की पोस्को अॅक्ट.ज्या अंतर्गत १६ वर्षा खालील मुलांचा जर समावेश बलात्कार मध्ये असेल तर अशा मुलांना पण प्रौढ म्हणूनच त्यांचावर कार्यवाही होयील.तसेच अशा प्रकारच्या केसेस लगेच ऑनलाइन रजिस्टर होतील.
आपल्या देशात प्रत्येक २ मिनिटात एक बलात्कार होतोय. ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे. त्यातही अल्पवयीन मुली वरील अत्याचार खूपच जास्त प्रमाणात वाढत आहेत.याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कडून न होणारा प्रतिकार. अर्थात बालके लहान असल्यामुळे ते बिचारे प्रतीकराही करू शकत नाहीत.एवढे करूनही या वर्षी जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेला कथुवा बलात्काराने देश पुन्हा हादरला. एका ८ वर्षाच्या निष्पाप मुलीला ३-४ जणांच्या टोळक्याने एका मंदिरात ५-६ दिवस तिला बेशुद्ध करून बलात्कार केले. ही बातमी वाचून मन अगदी सुन्न झाले.असे वाटले की खरंच हा आपला भारत आहे ज्याच्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे, जिथे स्त्रिला मातेचा दर्जा आहे, जसे सरस्वती माता, दुर्गा माता, लक्ष्मी माता इत्यादी इत्यादी.जिथे आपण स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना शिक्षण देत आहोत.तरीही असे घृणास्पद प्रकार आपल्या देशात होतात.
यावर उपाय म्हणजे कायदे कठोर तर केलेच पाहिजे पण त्यातही अश्या केसेस चे निकाल हे जलद न्यायालयाने चालवले गेले पाहिजेत. म्हणजे पीडितांना लवकर न्याय मिळेल. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे.म्हणजे इतरांना चांगला वचक बसेल.
 तसेच महिला वरील अत्याचार च्या घटना विरोधात  जर समाज ऐकवटला आणि न्यासाठी लढू लागला तर कोणत्याच नराधमाचे हात सरसावणार  नाहीत अशा प्रकारची कृत्य करण्या साठी ,कोणाचीच हिंम्मत होणार नाही महिलांकडे वाकड्या नजरेने बगण्याची . 

Sunday, May 13, 2018

गुन्हेगारीचे बदलते स्वरूप

 
  माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजात राहून तो स्वतःची प्रगती स्वताचा विकास साधत असतो आणि म्हणूनच समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा त्याच्या वर परिणाम होत असतो . असाच मानव जीवनावर परिणाम करणारे विविध गुन्हे तसेच गुन्हेगारी चे बदलते स्वरूप या विषयावर आजच्या माझ्या ब्लॉग लेखनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करतेय.
१९८०-९० च्या दशकात भारतात विशेषतः महाराष्ट्रात गॅंग वॉर खूप प्रचंड प्रमाणात होते. अशा प्रकारच्या गुन्हेगारीची सुरुवात कापड गिरण्या बंद झा्यानंतर प्रामुख्याने झाली. हातांना काम नसल्यामळे तसेच झटपट पैसा कमवायचा असल्यामुळे तेव्हाचा तरुण वर्ग अश्या प्रकारच्या गुन्हेगारी कडे वळला. त्यातूनच पुढे या गुन्हेगारांच्या टोळ्या पडला. यातूनच एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. याचाच परिणाम म्हणजे एकमेकांची गळेकापू स्पर्धाच लागली या टोळ्यांमध्ये. विशेषतः मुंबई मध्ये याचे प्रमाण खूपच जास्त होते यातूनच पुढे दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन असे अट्टल गुन्हेगार निर्माण झाले.मुंबई पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या म्हणून आज मुंबई शांत व सुरक्षित आहे
  टोळी टोळी च्या  मधील भांडण  आणि त्यातुन होणारे गुन्हे यातुन  समाज सुटतो न सुटतो तोच  सायबर crime अंतर्गत घडणारे गुन्हे आशा नव्या संकटाने पुन्हा समाजाला घेरले ,
: हल्ली आपण सायबर क्राईम, कॉम्प्युटर हॅकिंग असे अनेक नवीन शब्द ऐकत असतो. काय आहे नक्की हा प्रकार, काय आहे गुन्हेगारीचे बदलेले स्वरूप हे आपण जाणून घेऊया ,
गुन्हेगारी म्हणजे फक्त खून, दरोडा, चोरी या पुरताच मर्यादित रहालेली नाही, हीचे स्वरूप आता बऱ्यापैकी बदलेले आहे.
पूर्वी आपण वर्तमानपत्रात वाचायचो की आज आमुक या ठिकाणी दरोडा पडला, आज आमुक् ही बँक लुटली गेली, किंवा आज अामुक या ठिकाणी दरोडेखराकडून इतके लोकांचा खून झाला इत्यादी इत्यादी.
जरी अशी प्रकारची गुन्हेगारी थांबली नसली तरी त्यात आता सायबर क्राईम चा गुन्हांची भर पडली आहे.
मागील काही महिन्यांपासून आपण काही नवीन शब्द ऐकत आलोय जसे की "जगातील अनेक राष्ट्रामध्ये wannacry नामक कॉम्प्युटर व्हायरस ने धुमाकूळ घातला होता. अनेक राष्ट्रामध्ये hospital, education institutes, companies यांच्या कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्यात आल्या होत्या. कॉम्प्युटर हॅक करणाऱ्यांनी आपल्या माहितीच्या बदल्यात एका कॉम्प्युटर मागे ३०० डॉलर एवढी प्रचंड रक्कम मागितली होती.
 असे अनेक प्रकारचे सायबर क्राईम जगाच्या कुठल्या न कुठल्या तरी कोपऱ्यात होतच असतात. अशा प्रकारचे सायबर क्राईम करणारे गुन्हेगार हे जगात कुठल्याही देशात बसून जगातल्या कुठल्याही देशाचं संपूर्ण नेटवर्क सिस्टिम हॅक करू शकतात. कॉम्पुटर हॅक करणं म्हणजे आपली संपूर्ण संगणक व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेणे होय.
परंतु सायबर क्राईम वर नियंत्रण मिळवणे एवढे सोपे नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे असे प्रकारचे गुन्हेगार हे जगाच्या कुठल्याही देशात बसून हे गुन्हे करत असतात. त्यांचा नेमका ठावठिकाणा नसतो. त्यातही हे सायबर गुन्हेगार खूपच हुशार असतात. सतत आपला ठिकाणा बदलत असतात. त्यामुळे त्यांना पकडणे खूपच अवघड होऊन बसले आहे.
तरीही अश्या प्रकारच्या गुन्हेगारी साठी खास पथक नेमले जातात त्यांना एथिकल हॅकर्स असे म्हणतात.इथिकल हॅकर्स हे त्या गुन्हेगार प्रमाणेच विचार व कृती करतात. त्यामुळे असे गुन्हे रोखणे सोपे जाते.